Thursday 3 July 2008

वादळवाट..

थोडी सागर निळाई, थोडे शंख नि शिंपले,
कधी चांदणे टिपुर तुझ्या डोळ्यात वाचले,
कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात,
स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत,
कधी काळोख विझला, कधी विझली पहाट,
हुंकारला नदीकाठ, कधी हरवली वाट,
वार्यापावसाची गाज, काळी भासतच दाट,
कधी धूसर धूसर एक वादळाचि वाट

Wednesday 2 July 2008

राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय..

डिपारी डिपांग, डिचिपारी डिपांग, इडीपारी डिचीपारी डिपांग

काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार,
ताज्या ताज्या माळव्याचा भुईला ह्या भार,
ज्वानिच्या या मळ्यामदि पिरतीचं पाणी,
बघायला कवतिक आलं नाही कुणी,
मळ्य़ाला ला मळेवाली भेटलीच न्हाय,
अगं राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय?

काकडिचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा,
मुळ्य़ावानी कडू तरी, रंग गोरा गोरा,
लिम्बावानी कांति तुझी, बीटावानी वठ,
टंबाट्य़ाचे गाल तुझे, भिंडीवानि बोटं,
काळजात मंडई तू मांडशील काय,
अगं राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय?

( ------ अवधूतने गायलेल्या गाण्यातलं कडवं ----
नको दावू भाजीवाल्या फुकाचा रुबाब,
भाजी तुझी वर ताज़ी, आतून ख़राब,
गोड गोड बोलशील, पाडशिल फशी,
भाजी तुझी पाटीमंदी घेवू तरी कशी,
आजकाल कुणाचाबी भरवसा नाय,
अगं राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय? )

( ------ सलीलने गायलेल्या गाण्यातले कडवं ----
नको गाऊ भाजीवाल्या पिरतीची गाणी,
शिळ्य़ा शिळ्य़ा भाजीवर शिंपडुन पाणी,
ओसाडश्या गावी तुझा ओसाडसा मळा,
गुलाबाला सोसवना उन्हाळ्याच्या झळा,
स्ट्रोबेरीला कांदा कधी शोभणार न्हाय,
अरे अरे..राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय? )

तुज्यासाठी शिवाराची केलि मशागत,
खुरपला जीव दिलं काळजाचं ख़त,
राखायला मळा केली जिवाचिया वात,
बुजगावन्याचा परी उभा दिन-रात,
नको जळु दिन-रात, नको जीव टांगु,
ठाव हाय मला सारं, नको काही सांगू,
पिरतीत राजा तुज्या नाही काही खोड,
तुज्या हाती मिरचीबी लागतिया गोड,
माज्यासंग मळा तुझा कसशील काय?
अगं राणी माझ्या मळ्यामदि घुसशील काय?

अजून उजाडत नाही गं..

अजून उजाडत नाही गं, नाही गं॥

दशकांमागुन सरली दशके
अन् शतकांच्या गाथा गं,
ना वाटांचा मोह सुटे, वा
ना मोहाच्या वाटा गं,
पथ चकव्याचा गोल सरळ वा
कुणास उमगत नाही गं,
प्रवास कसला फ़रफ़ट अवघी,
पान जळातुन वाही गं॥

कधी वाटते दिवस-रात्र हे
नसते काही असले गं,
त्यांच्या लेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले गं,
स्पर्ष आंधळे, गंध आंधळे
भवताली वनराई गं,
तमातली भेसूर शांतता
कानी कुजन नाही गं॥

एकाच पळभर एखादी कळ
अशी सणाणून जाते गं,
क्षणात विरती अवघे पडदे
लक्ख काही चमचमते गं,
ती कळ सरते, हुरहुर उरते,
अन् पिकण्याची घाई गं,
वर वर सारे शिंपण काही
आतून उमलत नाही गं॥

अताशा असे हे..

अताशा असे हे मला काय होते?
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते

कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी दूर होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा

अंदाज कुठले, अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
कुठले नकाशे, अनुमान काही

कशी ही अवस्था कुणाला कळावे ?
कुणाला पुसावे ? कुणी उत्तरावे ?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे ?